देश / विदेश

Robert Vadra : कंगना राणौत संसदेत बसायच्या लायकीची नाही

Kangana Ranaut : रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त विधान

Political War : प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत या मागील काही वर्षांपासून त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी कंगनावर जोरदार हल्ला चढवला आहे. कंगना राणौत खासदार होण्यासाठी योग्य नाही, तिने बोलताना काळजी घ्यायला हवी. कंगना रणौत शिकलेली नाही, ती फक्त स्वत:चा विचार करते. लोकांचा नाही, असे वाड्रा यांनी म्हटले आहे. वाड्रा हे अध्यात्मिक प्रवासासाठी हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या हिमाचलमधील खासदार कंगना राणौत या सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. देशभरातून अनेक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. त्यानंतर भाजपतर्फे त्यांना समजही दिली होती. याचदरम्यान आता कंगना यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ‘कंगना राणौत या संसदेच्या सदस्य (खासदार) बनण्याच्या लायकीच्या नाहीत. त्या फक्त स्वतःचा विचार करतात’, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केली. शेतकरी आंदोलनावरून कंगना यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी हे टीकास्त्र सोडलं. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाला एकत्र यावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil : सरकारला पायाखाली घेण्याशिवाय पर्याय नाही

काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा

‘कंगना राणौत या एक स्त्री आहेत, मी त्यांचा आदर करतो. पण त्या संसदेत बसण्याच्या लायकीच्या आहेत, असं मला वाटत नाही’, असं वाड्रा म्हणाले. ‘त्या शिक्षित नाहीत. मला असं वाटतं की त्या इतर लोकांबाबत विचार करत नाहीत. त्या फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात. त्यांनी महिलांचा विचार करायला हवा. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देशाने एकत्र पुढे आले पाहिजे. महिलांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून तो सोडवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे,’ असंही रॉबर्ट वाड्रा म्हणाले.

तर बांगलादेशसारखी परिस्थिती

‘शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते’, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. ‘शेतकरी आंदोलनावेळी देशाचं नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितलं आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता, असं कंगनाने म्हटलं होतं.

भाजपने स्पष्टच सांगितलं

भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रानौतला अखेर तिच्याच पक्षाने घरचा आहेर दिला. कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपने तिचे कान टोचले आहेत. विशेष म्हणजे भाजपने अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत भूमिका मांडली आहे. कंगना रणौतने केलेल्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं. कंगनाने व्यक्त केलेले मत हे तिचं व्यक्तिगत मत आहे. शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर बलात्कार झाले होते, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर भाजपने भूमिका जाहीर केली होती.

error: Content is protected !!