Nagpur News : भाजपच्या स्थापना दिनी आम्ही संकल्प केला आहे की, शेवटच्या माणसापर्यंत पोहचून, वंचितांचा विकास करायचा आहे. विकासित भारताची यात्रा सुरू आहे. बुथ चलो अभियान आम्ही वारंवार राबवित आहोत. भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत पुन्हा बुथवर जात आहोत. आम्ही नेहमीच बुथ सक्षमीकरणावर भर देत आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे नमूद केले.
मित्रपक्षांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे. आम्ही 33 जागा लढू असा दावा आम्ही कधीच केला नाही. आमचा प्रयत्न आहे की तिघांचाही सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्यावर आम्ही समाधानी राहायचे. जयंत पाटील सध्या ‘इरेलेवंट’ झाले आहेत. जयंत पाटील त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे सध्या ते काहीही बोलतात. देशात येवढी मोठी निवडणूक चालली आहे त्यात जयंत पाटील कुठे दिसतात का? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दिसतात. जयंत पाटील आहेत कुठे? असा प्रश्न पडतो असे फडणवीस म्हणाले.
Lok Sabha Election : जातीच्या नव्हे विकासाच्या आधारावर मतदान करा
भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल महाविकास आघाडीचे वर्णन चांगले केले. महाविकास आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे. त्यांना दिशा नाही. हे तीनही इंजिन वेगवेगळ्या दिशेने जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.